Friday, July 18, 2025

Date:

पदवी असूनही नोकरी नाही, अखेर न्याय मिळाला! संघर्ष समितीच्या लढ्याला यश; राज्य सरकारकडून ५०१२ प्राध्यापक पदांसाठी भरतीला मान्यता.

- Advertisement -

विषय हार्ड न्युज,पुणे | ८ जुलै २०२५ :
NET, SET आणि Ph.D. पात्रता असूनही वर्षानुवर्षे बेरोजगारीचे दाहक वास्तव सहन करणाऱ्या प्राध्यापकांना अखेर दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या ५०१२ प्राध्यापक पदे भरण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
         हा निर्णय ‘नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती’च्या सततच्या आंदोलन आणि प्रयत्नांचा मोठा विजय मानला जात आहे.शासन निर्णय (GR) लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्याआधी समितीचा संघर्ष थांबणार नसल्याचे ठाम मत समितीने मांडले आहे.

*बेमुदत सत्याग्रह आंदोलन करताना नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समिती.

संघर्षाची कहाणी :
संघर्ष समितीने गेल्या वर्षभरात पुणे व मुंबईसह अनेक ठिकाणी आंदोलनांचे आयोजन केले. बेरोजगारी, तासिका तत्वावरील अन्याय, आणि शासनाच्या उदासीन धोरणांवर लक्ष वेधण्यासाठी समितीने ९ वेळा बेमुदत सत्याग्रह आंदोलन केले.

महत्वाच्या आंदोलनांमध्ये
• २४ जून २०२४ – बेमुदत सत्याग्रह-६ (पुणे)
• १ ते ९ ऑगस्ट – ‘बेरोजगाराच्या वारी मुख्यमंत्र्यांकडे’
• २५ सप्टेंबर – सामूहिक आत्महत्या आंदोलन (सातारा)
• ७ एप्रिल २०२५ पासून – बेमुदत सत्याग्रह-८
• २८ जूनपासून – चालू असलेले बेमुदत सत्याग्रह-९ (मुंबई)
या काळात समितीच्या कार्यकर्त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय, कुलगुरू, मुख्यमंत्री, मंत्री यांच्याशी थेट संवाद साधला आणि विविध माध्यमातून प्रश्न मांडले.

संघर्षामागची वेदना आणि अभिमान :
या लढ्याच्या केंद्रस्थानी होते ते शोषित, पात्र आणि मेहनती प्राध्यापक, जे उच्चशिक्षित असूनही CHB तत्त्वावर अत्यल्प मानधनावर काम करत होते. त्यांच्या आवाजाला धार देण्यासाठी संघर्ष समितीने झगडले. मात्र, “ज्यांच्यासाठी लढा दिला, त्यांचाच संख्याबळ आणि पाठिंबा अपुरा राहिला,” अशी खंतही समितीने मांडली. तरीही, “ज्यांनी सर्व अडचणींवर मात करून झुंज दिली, त्या मावळ्यांचा आम्हाला अभिमान आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी व्यक्त केले.

समितीचा इशारा आणि आवाहन :
शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असली तरी शासन निर्णय जाहीर होईपर्यंत आणि भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.आगामी काळात NET/SET, Ph.D. धारक बेरोजगार आणि CHB प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, हा लढा केवळ नोकरीचा नसून शिक्षणातील समानतेचा आहे, हे लक्षात घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

शेवटचा शब्द :
ही भरती केवळ नोकरी मिळवण्याची संधी नाही, तर संघर्षाच्या, एकजुटीच्या आणि हक्कासाठी झगडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याभिमुख शिक्षकाच्या स्वाभिमानाचा विजय आहे.

“शिकलेलं पण थांबलेलं’ आयुष्य अखेर चालू होणार – हीच खरी बातमी”!

” हाच लढा शिक्षकांचा, हाच विजय शिक्षणाचा”!

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

सरकारी नोकरभरतीला वेग व पारदर्शकता: डॉ. प्रमोद सावंत यांनी GSSC चे नव्या पायाभूत सुविधांनी सज्ज कार्यालय उघडले.

सर्व विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत; ७५२ पदांच्या भरती प्रक्रियेला...

गोव्याचा स्वच्छतेत देशभर झेंडा : पणजी देशातील सर्वात स्वच्छ शहर.

संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या...

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक...

एका बाजूला मेट्रो, दुसऱ्या बाजूला डालात रुग्ण!

पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील...