Thursday, January 15, 2026

Date:

“ठाकरे बंधू पुन्हा एकत्र”, विषय मराठी भाषा.

- Advertisement -

१८ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर ऐतिहासिक मिलन.

विषय हार्ड न्युज,वरळी, मुंबई | ५ जुलै २०२५:
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनांनी भरलेला दिवस ठरला. तब्बल १८ वर्षांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही एका व्यासपीठावर एकत्र आले. हे ऐतिहासिक मिलन वरळी येथे पार पडलेल्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने झाले.

          या प्रसंगी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारून अभिवादन केलं आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. हे दृश्य पाहून उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षांच्या वादानंतर आणि राजकीय अंतरानंतर हे पुन्हा एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणात मोठं वळण मानलं जात आहे.

      उद्धव ठाकरे म्हणाले, “बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.” तर राज ठाकरे म्हणाले, “भूतकाळ विसरून, राज्याच्या भविष्याकडे पाहण्याची ही वेळ आहे.
विश्लेषकांच्या मते, या एकत्र येण्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे यांचं नवीन राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.
ही घटना केवळ राजकीय नाही, तर ती एक भावनिक पुनर्मिलनाची साक्ष देणारी आहे. ठाकरे बंधूंमधील हे जुळलेलं नातं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणार, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष; प्रभागात कामाचीच पोचपावती — आंदेकर कुटुंबाचा दावा

पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग...

पुण्यात लोकशाही धोक्यात; भाजप–महायुतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) :  महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या...