Saturday, July 19, 2025

Date:

“चार महिन्यांत निवडणुका घ्या; प्रशासकांना हटवा – सर्वोच्च न्यायालयाचा राज्याला आदेश”

- Advertisement -

प्रशासकांचा काळ संपतोय; महाराष्ट्रातील महानगरपालिका व पंचायत निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश

विषय हार्ड न्युज,नवी दिल्ली :महाराष्ट्रात दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीचा मार्ग दाखवला आहे.
महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे अनेक शहरांतील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, सत्तापालटाच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

         न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकांची एकाधिकारशाही संपुष्टात येणार असून पुन्हा लोकशाही प्रक्रियेला चालना मिळणार आहे.
           खंडपीठाने सांगितले की, पुढील चार आठवड्यांत निवडणूक अधिसूचना जाहीर होणे बंधनकारक असून, त्यानंतर चार महिन्यांत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे.
             सुनावणीदरम्यान, ओबीसी आरक्षणाविषयीही न्यायालयाने स्पष्ट भाष्य करत समाजाला विचार करायला लावणारे मत नोंदवले. न्या. सूर्यकांत म्हणाले, “आज आरक्षण रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे. आत गेलेले लोक इतरांना संधी देत नाहीत. सामाजिक समतेचा व्यापक विचार व्हायला हवा.”
           ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्या याचिकेमुळे ही सुनावणी शक्य झाली. त्यांनी प्रशासकांच्या नियुक्तीमुळे लोकशाही मूल्यांचा संकोच होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
हा निर्णय मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड आदी महानगरांतील राजकीय घडामोडींना गती देणारा असून, सर्वपक्षीय राजकीय रणनीतीसाठीही निर्णायक ठरणार आहे.

        या निर्णयामुळे लोकशाही प्रक्रियेवर विश्वास बसलेला सामान्य मतदार, सत्तेच्या प्रतिक्षेत असलेले विरोधी पक्ष, आणि राजकीय भवितव्य ठरवू इच्छिणारे कार्यकर्ते यांच्यासाठी एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

सरकारी नोकरभरतीला वेग व पारदर्शकता: डॉ. प्रमोद सावंत यांनी GSSC चे नव्या पायाभूत सुविधांनी सज्ज कार्यालय उघडले.

सर्व विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत; ७५२ पदांच्या भरती प्रक्रियेला...

गोव्याचा स्वच्छतेत देशभर झेंडा : पणजी देशातील सर्वात स्वच्छ शहर.

संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या...

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक...

एका बाजूला मेट्रो, दुसऱ्या बाजूला डालात रुग्ण!

पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील...