Friday, July 18, 2025

Date:

“कोकणचा हापूस थेट पुणेकरांच्या दारी!”

- Advertisement -

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये आंबा महोत्सव सुरू; महिला बचत गटांचेही आकर्षक स्टॉल्स, महोत्सव ३१ मे पर्यंत.

विषय हार्ड न्युज,पुणे, दि. २ एप्रिल २०२५ : महाराष्ट्रात आंब्याचा हंगाम सध्या बहरात आहे. मात्र, तांत्रिक विकास आणि शहरीकरणाच्या झपाट्यामुळे पारंपरिक आमराया नामशेष होत चालल्या आहेत. त्यामुळे दर्जेदार आणि गावरान आंबा मुख्यतः कोकणातच उपलब्ध आहे. अशा पार्श्वभूमीवर पुणेकरांना थेट कोकणातून हापूस आणि इतर दर्जेदार आंबा रास्त दरात मिळावा, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

या उपक्रमाअंतर्गत गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये ‘आंबा महोत्सव’ आजपासून (१ एप्रिल) सुरू झाला असून, तो ३१ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

शेतकऱ्यांना बाजारभाव, ग्राहकांना रास्त दर
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आंबा विक्री व्यवस्थेतील दलाल किंवा मध्यस्थ टाळण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळणार असून, ग्राहकांना उत्तम दर्जाचा आंबा कमी दरात उपलब्ध होणार आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ यांनी सांगितले की, हा उपक्रम यापुढे दरवर्षी आयोजित केला जाणार आहे.

महिला बचत गटांचा सहभाग लक्षवेधी
या महोत्सवात ‘उमेद अभियानांतर्गत’ महिला बचत गटांनी तयार केलेल्या गावरान वस्तू व खाद्यपदार्थांचाही समावेश आहे. यासाठी एकूण ६० स्टॉल्सपैकी १५ स्टॉल्स महिला गटांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे पुणेकरांना ग्रामीण भागातील पारंपरिक चविष्ट पदार्थांची चव घेण्याची संधी मिळणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या उपक्रमाचा पुणेकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे म्हणाले की, “महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा दुय्यम पण महत्त्वाचा हेतू आहे.”

शहरात आणखी तीन ठिकाणी आंबा महोत्सव
पणन महामंडळातर्फे याशिवाय शहरात आणखी कोथरूड (गांधी भवन), हडपसर (मगरपट्टा) आणि खराडी या ठिकाणी स्वतंत्रपणे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

सरकारी नोकरभरतीला वेग व पारदर्शकता: डॉ. प्रमोद सावंत यांनी GSSC चे नव्या पायाभूत सुविधांनी सज्ज कार्यालय उघडले.

सर्व विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत; ७५२ पदांच्या भरती प्रक्रियेला...

गोव्याचा स्वच्छतेत देशभर झेंडा : पणजी देशातील सर्वात स्वच्छ शहर.

संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या...

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक...

एका बाजूला मेट्रो, दुसऱ्या बाजूला डालात रुग्ण!

पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील...