Sunday, July 20, 2025

Date:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू..

- Advertisement -

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रावर शोककळा

विषय हार्ड न्युज, पुणे:-जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये डोंबिवलीतील तीन, पुण्याच्या दोन आणि पनवेलच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
डोंबिवलीच्या अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पनवेलचे दिलीप देसले हेही या हल्ल्यात बळी गेले.

या हल्ल्यात महाराष्ट्रातील एस. बालचंद्रू, सुबोध पाटील आणि शोबीत पटेल हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेने संपूर्ण राज्य हळहळले असून, हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून जखमींना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share post:

लोकप्रिय बातम्या

More like this
Related

सरकारी नोकरभरतीला वेग व पारदर्शकता: डॉ. प्रमोद सावंत यांनी GSSC चे नव्या पायाभूत सुविधांनी सज्ज कार्यालय उघडले.

सर्व विभागांतील रिक्त पदे आयोगामार्फत; ७५२ पदांच्या भरती प्रक्रियेला...

गोव्याचा स्वच्छतेत देशभर झेंडा : पणजी देशातील सर्वात स्वच्छ शहर.

संखाळी शहराला ‘प्रॉमिसिंग स्वच्छ शहर’ पुरस्कार | राष्ट्रपतींच्या...

“गे डेटिंग अ‍ॅपवर ‘प्रेमाचा सापळा’, गाडीत नेऊन व्हिडिओ शूट, मग ऑनलाईन लूट”.

नाही’ म्हटल्यावर कपडे काढून धमकी: नांदेड सिटी पोलिसांची धडक...

एका बाजूला मेट्रो, दुसऱ्या बाजूला डालात रुग्ण!

पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील...