मुंबई, २३ एप्रिल
विषय हार्ड न्युज, पुणे:— काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांच्या मृत्यूनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
हल्ल्यानंतर अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांसाठी डॉ. गोऱ्हे यांनी तत्काळ संपर्क साधून मदत कार्याची माहिती घेतली. शासनाकडून लवकरच विमानसेवेची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले.
उपसभापती कार्यालयात हल्ल्यातील बळींसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “विघातक शक्तींना भारतीय एकतेचे प्रत्युत्तर मिळेल. एकसंघ भारत हीच खरी ताकद आहे.”
भारतीय लष्कर, डॉक्टर व आरोग्यसेवकांचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या तत्परतेचे अभिनंदन केले.